सुशिलामाई काळे महाविद्यालयात भावनिक बुद्धिमत्ता विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

सुशिलामाई काळे महाविद्यालयात भावनिक बुद्धिमत्ता विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न


सुशिलामाई काळे महाविद्यालयात भावनिक बुद्धिमत्ता विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
कोळपेवाडी । प्रतिनिधी । आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात केवळ बौद्धिक क्षमता असून चालत नाही तर माणसाला आपल्या भावनांचे योग्य नियोजन करता येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोळपेवाडी येथे भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर दि. ६ व ७ रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चासत्रात देशभरातील विविध स्तरांतील तज्ञ आणि अभ्यासकांनी सहभाग घेतला त्याच बरोबर डॉ. मल्लाप्पा कोडनापूर, डॉ. विशाल सांगळे, डॉ. विद्या जिरागे, डॉ. एस. एन. शेळके, डॉ. तुशाबा शिंदे, डॉ. एस. जी. कोंडा आणि डॉ. डी. के. मोरे या मान्यवर मार्गदर्शकांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

चर्चासत्रामध्ये सर्व मार्गदर्शकांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगितली. दैनंदिन जीवनातील ओळखीची उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले की, भावनिक बुद्धिमत्ता ही काही क्लिष्ट गोष्ट नसून ती आपल्या वागण्या-बोलण्याचा आणि विचारांचा भाग आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत यश मिळवतानाच स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांना कसे सामोरे जावे. ताणतणावाचे नियोजन कसे करावे आणि इतरांच्या भावनांचा आदर ठेवून संवाद कसा साधावा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या चर्चासत्रात वैशिष्ट्य पूर्ण संशोधनाला प्राधान्य दिले गेले. वेगवेगळ्या राज्यांमधील आणि विविध महाविद्यालयांमधील संशोधकांनी पाठवलेल्या दर्जेदार संशोधन लेखांचे संकलन करून एका विशेष संशोधन पत्रिकेचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पत्रिकेमुळे भविष्यातील अभ्यासकांसाठी भावनिक बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील नवे पैलू खुले होणार आहेत.हे राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. विजया गुरसळ व निरीक्षक नारायण बारे यांनी मोलाची जबाबदारी पार पडली. याच बरोबर प्रा. पांडुरंग मोरे, प्रा. विनोद मैंद, डॉ. संतोष जाधव, प्रा. उमाकांत कदमव व प्रा. पंकज वाबळे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमप्रसंगी राज्यासह देशातील संशोधक विद्यार्थी, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक तसेच भावनिक बुद्धिमत्ता या विषयाशी संबंधित सर्व क्षेत्रातील व्यक्ती आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते



