ब्रेकिंग

1 मे महाराष्ट्र दिना निमित्त संगमनेरात समतेची मिसळ कार्यक्रमाचे आयोजन

1 मे महाराष्ट्र दिना निमित्त संगमनेरात समतेची मिसळ कार्यक्रमाचे आयोजन

1 मे महाराष्ट्र दिना निमित्त संगमनेरात समतेची मिसळ कार्यक्रमाचे आयोजन
संगमनेर । प्रतिनिधी । देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा व मानवतेचा विचार घेऊन संगमनेर युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत नवीन नगर रोड येथे सर्व धर्मीय, सर्व समाजाच्या योगदानातून व सहकार्यातून समतेची मिसळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

समतेची मिसळ या कार्यक्रमाबाबत माहिती देताना डॉ.थोरात म्हणाल्या की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अनेक हुतात्म्यांनी योगदान दिले असून या सर्वांना अभिवादन करून हा महाराष्ट्र अधिक समृद्ध होण्यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचा लोककल्याणाचा व समतेचा विचार प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार म्हणून ओळखला जातो. सर्व समाज व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने येथे राहतात. हा समतेचा व मानवतेचा मंत्र अधिक घट्ट करण्यासाठी सर्व समाज बांधवांच्या, व युवक आणि पुरोगामी संघटनांच्या सहकार्यातून व योगदानातून समतेची मिसळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत नवीन नगर रोड येथे तालुका व शहरातील सर्व धर्मीय व सर्व समाजाचे लोक महाराष्ट्रीयन मिसळसाठी लागणाऱ्या विविध वस्तू देऊन एकत्रित मिसळ करणार आहेत.या कार्यक्रमासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, यांच्यासह संगमनेर मधील विविध सेवाभावी संस्था व संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक, आध्यात्मिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित राहून सहभागी होणार आहेत.

समतेची मिसळ यामधून समता व बंधुभाव अधिक वाढीस लागावा यासाठी हा उपक्रम युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आले असल्याच्या डॉ.जयश्रीताई थोरात यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या समतेच्या मिसळ कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व नागरिक महिला युवक ज्येष्ठ या सर्वांनी उपस्थित राहून या मिसळचा आनंद घ्यावा असे आवाहन संगमनेर तालुका व शहर युवक काँग्रेस, छत्रपती प्रतिष्ठान, फुले शाहू आंबेडकर विचार मंच, सर्व पत्रकार बंधू यांच्यासह विविध संघटनांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!