गोदावरी लाभक्षेत्राकरीता डाव्या आणि उजव्या कालव्यातून सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन बुधवार पासुन – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
गोदावरी लाभक्षेत्राकरीता डाव्या आणि उजव्या कालव्यातून सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन बुधवार पासुन – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

गोदावरी लाभक्षेत्राकरीता डाव्या आणि उजव्या कालव्यातून सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन बुधवार पासुन – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी । प्रतिनिधी । गोदावरी लाभक्षेत्राकरीता डाव्या आणि उजव्या कालव्यातून सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५ पासून सोडण्याच्या सुचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या आधिका-यांना दिल्या. या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या आधिका-यां समवेत चर्चा करुन, लाभक्षेत्रात पाण्याची असलेली वाढती मागणी तसेच उन्हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागाने दिनांक ३० एप्रिल २०२५ ते १ जून २०२५ दरम्यान सिंचन व बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे.

लाभक्षेत्रातील शेतक-यांची मागणी आणि उन्हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले. या आवर्तनाचा लाभ रब्बी पिकांना होणार असून, या बरोबरीने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. उन्हाची तिव्रता वाढल्याने काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे. या आवर्तनाचा या गावांनाही लाभ व्हावा या उद्देशाने सिंचन आणि बिगर सिंचन असे एकत्रित आवर्तन सोडण्याच्या सुचना मंत्री विखे पाटील यांनी विभागाला दिल्या आहेत उन्हाची वाढती तिव्रता लक्षात घेवून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता जलसंपदा विभागाच्या आधिका-यांनी घ्यावी, तसेच शेतक-यांनीही पाण्याचा योग्य विनीयोग करावा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.



