ब्रेकिंग

आ. थोरात हे पक्ष व राजकारण नसून संगमनेरकरांची भावना – डॉ. संजय मालपाणी

आ. थोरात हे पक्ष व राजकारण नसून संगमनेरकरांची भावना – डॉ. संजय मालपाणी

संगमनेर ( प्रतिनिधी) – स्वच्छ प्रतिमा असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांचा संपूर्ण राज्यामध्ये आदर होतो. हे सगळ्या संगमनेरकरांसाठी नेहमी अभिमानास्पद राहिले असून आमदार बाळासाहेब थोरात हे पक्ष किंवा राजकारण नसून तर संगमनेरकरांची भावना असल्याचे प्रतिपादन डॉ.संजय मालपाणी यांनी केले आहे.मालपाणी लॉन्स येथे व्यापारी बांधवांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ डॉ सुधीर तांबे ,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट ,डॉ.जयश्रीताई थोरात, प्रकाश कलंत्री ,निलेश जाजू, ओंकार भंडारी, सोमेश्वर दिवटे, कल्पेश मेहता ,कैलास सोमानी, सुभाष ताजने राणी प्रसाद मुंदडा आदींसह संगमनेर शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. संजय मालपाणी म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांचे सुसंस्कृत नेतृत्व, संगमनेर मधील शांततेचे आणि सुसंस्कृतपणाचे वातावरण यामुळे बाहेरी नागरिक सुद्धा या ठिकाणी वास्तव्यासाठी पहिले प्राधान्य देतात. शिक्षण नगरी म्हणून आता संगमनेर नावारूपास आले आहे. निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याच्या समृद्धतेमध्ये भर टाकली आहे. शेती, दूध, फळबागा यांसह ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाल्याने शहरातील बाजारपेठ फुलली आहे.

कर्तुत्वान नेतृत्वाच्या सततच्या कामातून उभा राहिलेला हा तालुका असून आमदार बाळासाहेब थोरात हे पक्ष किंवा राजकारण नसून संगमनेरकरांची भावना आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीला चांगले वातावरण असून संगमनेर तालुक्याला नेतृत्वाची संधी मिळावी ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असून याकरता सर्वांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. तर कैलास सोमानी म्हणाले की, संगमनेरमध्ये समृद्ध अर्थव्यवस्थेबरोबर चांगले वातावरणामुळे सूकून असलेले शहर म्हणून संगमनेरची सर्व दूर ओळख निर्माण झाली आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी संगमनेरची ओढ प्रत्येकाला कायम असते. असे येथील वातावरण आहे आणि  हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचे आहे. हीच परंपरा वाटचाल कायम ठेवण्यासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना मोठा मताधिक्य मिळण्यासाठी कटिबद्ध व्हावे असे आवाहन केले.यावेळी विविध व्यापारी बांधवांनी आपली मनोगते व्यक्त केली

शेतकरी व व्यापारी यांचा प्रामाणिकपणा हे बाजारपेठेचे वैशिष्ट्य – आमदार थोरात

संगमनेरचा माणूस कष्टाळू आणि प्रामाणिक आहे .त्यामुळे राज्यात कुठेही गेले तरी त्याला सन्मान मिळतो. छोटे-मोठे अनेक व्यापारी बाहेरून संगमनेरात येतात. आणि संगमनेरचे व्यापारी जेव्हा मेट्रो शहरांमध्ये बाहेर जातात तेव्हा मोठ्या विश्वासाने व्यवहारांमध्ये आदान प्रदान होते. येथील व्यापारी, शेतकरी सर्वच नागरिक प्रामाणिक असल्याने बाजारपेठेमध्ये समृद्धी नांदत असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!