डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयातर्फे वाळूंज येथे शेतकरी चर्चासत्र उत्साहात संपन्न
डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयातर्फे वाळूंज येथे शेतकरी चर्चासत्र उत्साहात संपन्न

अहिल्यानगर । प्रतिनिधी । विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत वाळुंज (ता. नगर) येथे शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. बाळासाहेब दरेकर (माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच) होते. प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. विवेक निकम (सहयोगी प्राध्यापक, कृषि महाविद्यालय विळद घाट), मा. श्री. पांडुरंग घोरपडे (सहाय्यक कृषि अधिकारी, वाळुंज), सुमिटोमो अॅग्रोकेमिकलचे श्री. मच्छिंद्र वाघ, आणि पारिजात कंपनीचे श्री. संदीप कचरे उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयातर्फे वाळूंज येथे शेतकरी चर्चासत्र उत्साहात संपन्न
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. नारायण करांडे (मंडळ कृषि अधिकारी, वाळकी), श्री. संजय बोरुडे व श्री. बी. टी. गडधे (उप कृषि अधिकारी, वाळकी), प्रा. के. एस. दांगडे (कार्यक्रम समन्वयक, कृषि महाविद्यालय), तसेच सहाय्यक कृषि अधिकारी श्री. संतोष उगले व श्री. अनिल तोरकड यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी गावातील प्रगतशील शेतकरी पोपटराव साठे, रावसाहेब शिंदे, संतोष जाधव, अर्जुन कर्डिले, शिवाजी कर्डिले, विलास ढाकणे, अशोक दरेकर, अनिल दरेकर, हनुमंत काकडे, नामदेव गायकवाड, सोमनाथ जाधव, जनार्दन हिंगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक कृषि अधिकारी श्री. पांडुरंग घोरपडे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. डॉ. विवेक निकम यांनी खरीप हंगामातील मका पिकाचे उत्पादन वाढवण्याचे तंत्रज्ञान, बियाण्याची उगम क्षमता चाचणी, व सामूहिक बीज प्रक्रियेचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले.

मंडळ कृषि अधिकारी श्री. नारायण करांडे यांनी चालू खरीप हंगामातील विविध कृषी मोहिमांविषयी माहिती देत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. उप कृषि अधिकारी श्री. बी. टी. गडधे यांनी शासनाच्या कृषि योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. श्री. संजय बोरुडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ कशी साधता येईल यावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी प्रा. सुनील कल्लापुरे (संचालक – तांत्रिक, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट, अहिल्यानगर), डॉ. सोमेश्वर राऊत (प्राचार्य, कृषि महाविद्यालय) तसेच वाळुंज गावच्या सरपंच श्रीमती पार्वतीताई हिंगे व उपसरपंच श्रीमती कविताताई गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एस. दांगडे यांनी केले. सूत्रसंचालन कृषीदूत सुमित गोलेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गाडे अभिजीत यांनी मानले. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी कृषीदूत ओम बेंडाळे, शिवम भोर, साहिल जाधव, सुमित गोलेकर व अभिजीत गाडे यांनी परिश्रम घेतले.



