ब्रेकिंग

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाने पुणतांब्याच्या ऐतिहासिक वैभवात भर – आ. आशुतोष काळे

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाने पुणतांब्याच्या ऐतिहासिक वैभवात भर – आ. आशुतोष काळे

जाहिरात मो-7756045359

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाने पुणतांब्याच्या ऐतिहासिक वैभवात भर – आ. आशुतोष काळे

कोपरगांव । प्रतिनिधी ।   लोककल्याणकारी राज्यकारभाराचे आदर्श प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पुणतांबा परिसरासह महाराष्ट्रात शेकडो मंदिरांची उभारणी केली असून विहीर, बारव आणि गोदावरी नदीवर घाट बांधले आहेत. दक्षिण काशी म्हणून पुणतांबा गावाची महाराष्ट्रात वेगळी ओळख असून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या उभारणीतून पुणतांब्याच्या ऐतिहासिक वैभवात अधिकची भर पडणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्ह्टले आहे.


प्रजाहितदक्ष पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने पुणतांबा गावच्या पावन भूमीत लोकसहभागातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत रविवार (दि.३१) रोजी पार पडले यावेळी ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना आ.आशुतोष काळे यांनी सांगितले कि, अध्यात्म, संस्कृती, संघर्ष आणि इतिहास यांचा संगम पुणतांब्याच्या पवित्र भूमीत पाहायला मिळतो. अनेक नव्या क्रांतीची सुरुवात या गावातून झाली असून २०१७ रोजी झालेले राज्यव्यापी शेतकरी आंदोलन त्याचे उत्तम उदाहरण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी पुणतांबा भूमीत उभारलेली शेकडो मंदिरे आणि गोदावरी नदीवरील घाटाचे संवर्धन करण्यासाठी जवळपास ३.५ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये अहिल्याघाटाच्या २६ भव्य दगडी पायऱ्या, आकर्षक गोलाकार बुरूज, प्राचीन महादेव मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर आणि संत चांगदेव महाराज समाधी परिसर यांसारखी महत्त्वाची धार्मिक व पवित्र स्थळे आणि ऐतिहासिक गोष्टींचे संवर्धन करून भाविक, अभ्यासक आणि पर्यटक यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुणतांबा गावातील इतिहासाचे संवर्धन होणार आहे. तसेच नदी संवर्धन योजनेच्या अंतर्गत ११ कोटींच्या कामांचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे सादर केलेला आहे. हे दोन्ही प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी आपण सहकार्य करावे असे साकडे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना घातले.


यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते अधिक मासानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाटावर सामूहिक गंगा आरती करण्यात आली. मंत्रोच्चार, दीपप्रज्वलन आणि हरिनामाच्या गजरात झालेल्या या गंगा आरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. यावेळी गौतम सहकारी बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, माजी सरपंच मुरलीधर थोरात, डॉ.धनंजय धनवटे, मा.जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहारे, सौ. वैजयंती धनवटे, संध्या थोरात, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, आण्णासाहेब कोते, संदिप लहारे, दिलीप चौधरी, जळगावचे सरपंच शिवाजीराव साबदे, शामसुंदर धनवटे, नानासाहेब काळवाघे, भाऊसाहेब जाधव, दत्तात्रय धनवटे, विजय धनवटे, चांगदेव धनवटे, मच्छिन्द्र चौधरी, बबनराव बरवंट, महेश औताडे, सौ. संगिता भोरकडे, शांतीलाल भाटी, राहुल धनवटे, दिनेश जगताप, शिवाजीराव जगताप, राजेंद्र धनवटे, बाळासाहेब भोरकडे, दिपक गायकवाड, शिवाजी प्रधान, सुनिल थोरात, विलास पेटकर, श्याम जगताप, रामकृष्ण चव्हाण, अरुण बाबरे, पत्रकार अजय जोशी, संजय जोगदंड, मनोज गुजराथी, किरण नाईक, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पुणतांबा ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

मागील महिन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने गोदा ते नर्मदा जल यात्रेचे नियोजन करण्यात येवून हि यात्रा यशस्वी झाली आहे. याच यात्रेला अनुसरून पुणतांबा येथील अहिल्यादेवींनी बांधलेल्या घाटाचे संवर्धन करण्यात येणार आहे. पुणतांबा ग्रामस्थांच्या पुढाकारातून पुणतांब्याच्या पवित्र भूमीतील अहिल्यादेवींचा इतिहास जपण्याचे कार्य होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे.या ऐतिहासिक घाटाच्या संवर्धनासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या मागणीनुसार निधी कमी पडू देणार नाही.
पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!