ब्रेकिंग

सौ प्रभावती घोगरे यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड

सौ प्रभावती घोगरे यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड
संगमनेर । प्रतिनिधी ।अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर झालेल्या नवीन समितीमध्ये जिल्ह्यातील महिला नेत्या सौ प्रभावती काकी घोगरे यांची राज्य जनरल सेक्रेटरी निवड झाली आहे. या निवडीबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे नव्याने राज्य जनरल सेक्रेटरी पदावर निवड झाल्याबद्दल सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांची निवड झाली आहे याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.पद्माताई थोरात, सौ शितल उगलमुगले, सौ मीना थेटे, अमोल घोगरे, सचिन मुन्ना आहेर, दीपक विखे, शामराव घोगरे ,दीपक घोगरे ,सौ.जयाताई गाडे, गौतम आहेर, सुभाष पा. गुंजाळ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सौ प्रभावती घोगरे यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड

सौ.प्रभावती घोगरे यांनी कृषी क्षेत्रात आदर्शवत काम केले असून महिलांचे मोठे संघटन केले आहे. राहता मतदार संघातील काँग्रेसच्या नेत्या असून त्यांनी विधानसभा  काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मोठा जनसंपर्क सहज संवाद, कृषीप्रधान संस्कृती आणि जनसेवेचा समर्थ वारसा यामुळे त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी त्यांची निवड झाली आहे.यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले की काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून काँग्रेस पक्षाने महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आणले आहे. महिला सबलीकरणासाठी अनेक योजना राबवताना अन्नसुरक्षा कायदा, आरोग्य सुरक्षा, माहितीचा अधिकार, याचबरोबर देशाने साधलेली प्रगती ही काँग्रेस पक्षाच्या काळातील आहे. काँग्रेसचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. देशाची राज्यघटना आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसचा विचार हा अत्यंत गरजेचा असून सध्या वाढलेले धार्मिक राजकारण हे देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने चिंतेचे आहे.तर सौ प्रभावती घोगरे म्हणाल्या की, आपण कायम सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब यांच्या हिताचा विचार केला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्यावर मोठा विश्वास टाकला. माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी या उपस्थित होत्या. मात्र राहता विधानसभेमध्ये निवडणूक प्रक्रियेची झालेला गोंधळ सर्व देशाला माहीत झाला आहे. यापुढील काळात महिला सबलीकरणासाठी अधिक सक्रियतेने काम करू असे त्या म्हणाल्या.सौ. प्रभावती घोगरे यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ, शहराध्यक्ष दिप चव्हाण, माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, सौ लताताई डांगे, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, सौ पद्माताई थोरात, सौ अर्चनाताई बालोडे, सौ प्रमिला अभंग यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!