सत्ताधाऱ्यांनी म्हाळुंगी पुलाचे काम राजकारणासाठी रखडवले – सोमेश्वर दिवटे
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाच म्हाळुंगी पुलासाठी पाठपुरावा

सत्ताधाऱ्यांनी म्हाळुंगी पुलाचे काम राजकारणासाठी रखडवले – सोमेश्वर दिवटे

सत्ताधाऱ्यांनी म्हाळुंगी पुलाचे काम राजकारणासाठी रखडवले – सोमेश्वर दिवटे
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाच म्हाळुंगी पुलासाठी पाठपुरावा


जनतेच्या विकासासाठी राजकारण करायचे असते हा मंत्र लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने जपला आहे. माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे शहर हायटेक व वैभवशाली असून संगमनेर मध्ये अत्यंत चांगल्या सुविधा नागरिकांना पुरवल्या जात आहे याचबरोबर निळवंडे धरणातून थेट पाईप लाईन योजना असल्याने भर उन्हाळ्यात सुद्धा संगमनेर करांना मुबलक पाणी मिळत होते.संगमनेर हायटेक बस स्थानक ,नगरपालिका , न्यायालय इमारत, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह , याचबरोबर प्रवरा नदीवर चार पूल आणि बायपास अशा मोठ्या विकासाच्या योजना राबवल्या आहेत संगमनेर शहर हे स्वच्छ व सुंदर शहर असून नगरपालिकेला याबाबत राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले हिरवाईचे सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे.साईनगर परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना सोयी करता माळुंगी पूल लवकरात लवकर व्हावा याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. पूल सुरू झाल्याने आनंद असून या पूल उभारणीचे श्रेय हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचे सोमेश्वर दिवटे यांनी म्हटले आहे .या परिसरातील स्थानिक नागरिकांनी या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन केले आहे.