ब्रेकिंग
नगर जिल्ह्यातील राजकारणाचे जादूगार – आमदार सत्यजित तांबे
नगर जिल्ह्यातील राजकारणाचे जादूगार – आमदार सत्यजित तांबे

कोपरगांव । प्रतिनिधी ।
आमदार शिवाजीराव कर्डिले हे प्रस्थापित नसतानाही प्रस्थापितांच्या जिल्ह्यात स्वतःचा एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राजकारण करून वेगळा ठसा उमटवणारे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी आहे.

पैलवान व्यक्तिमत्व असलेले आणि सतत हसतमुख आणि सकारात्मक विचारांचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सरपंच ते मंत्री असा राजकीय प्रवास केला. माझ्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काळात त्यांची रणनीती, विचारांची खोली आणि संघटन शक्ती अनुभवण्याचा मला योग आला. कायम लोकांमध्ये राहणारे,थेट बोलणारे,कृतिशील व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.



