माझी वसुंधरा योजनेअंतर्गत 1.5 कोटींच्या बक्षीस रकमेतून विविध विकासकामे मार्गी – आ.सत्यजीत तांबे
पर्यावरण व स्वच्छता कामामुळे संगमनेर नगरपरिषदेला 1.5 कोटींचे बक्षीस
माझी वसुंधरा योजनेअंतर्गत 1.5 कोटींच्या बक्षीस रकमेतून विविध विकासकामे मार्गी – आ.सत्यजीत तांबे

पर्यावरण व स्वच्छता कामामुळे संगमनेर नगरपरिषदेला 1.5 कोटींचे बक्षीस
महाराष्ट्र सरकारच्या माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत पर्यावरणीय कामाबद्दल संगमनेर नगर परिषदेला 1.5 कोटींचे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीस रकमेतून विविध विकासकामे मार्गी लावता येणार आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांनी स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हरित संगमनेर ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवताना संगमनेर शहरातील नागरिकांच्या सहकार्यातून स्वच्छ संगमनेर व सुंदर संगमनेर बनवले. लोकनेते बाळासाहेब थोरात मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून विविध विकासाच्या योजना मार्गी लागल्या.नगरपरिषदेच्या चांगल्या कामाची दखल घेऊन राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार नगर परिषदेला मिळाले आहेत. याचबरोबर माझी वसुंधरा 4.0 या योजनेतून मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात पर्यावरण पूरक प्रकल्प हरितपट्टा, विकास घनकचरा व्यवस्थापन,जलसंवर्धन यासारखी विकास कामे हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये हनुमान मंदिर, सावित्रीबाई फुले गार्डन, चैतन्य नगर गार्डन, गोविंद नगर,अकोले बायपास,श्रमपरिहार सोसायटी, नेहरू गार्डन, पुनर्वसन कॉलनी, राजापूर रोड,अकोले बायपास,सुयोग कॉलनी,संत गाडगेबाबा गार्डन,ऑरेंज कॉर्नर,दुर्गा गार्डन, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल, अभिनव नगर या ठिकाणी वृक्षारोपण व गार्डन विकास अभियान राबविण्यात येणार आहे. तर कोर्टाच्या मागे, घोडेकर मळा,पुनर्वसन कॉलनी, जिजामाता रोड, पावबाकी रोड व इतर ठिकाणी मियावाकी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
तसेच कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे ऑन ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या निधी अंतर्गत पर्यावरण विषयक माहिती व जनजागृती अभियान सुद्धा शहरात राबविण्यात येणार आहेत.लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेने केलेल्या सातत्याने पर्यावरण पूरक व संवर्धन कामाबद्दल मिळालेल्या या बक्षीस निधीतून इतर कामे मार्गे लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही बक्षिसाची रक्कम नवा निधी नाही ज्यांचे योगदान नाही त्यांनी श्रेय घेऊ नयेतत्कालीन नगराध्यक्ष सौ.दुर्गा ताई तांबे यांनी राबवलेल्या स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर व हरित संगमनेर मध्ये या उपक्रमाला संगमनेर मधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला त्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय पातळीवर सातत्याने नगर परिषदेला विविध पुरस्कार मिळाले आहेत. हा नव्याने दिलेल्या निधी नाही तर बक्षिसाची रक्कम आहे. ज्यांचे कोणतेही योगदान नाही अशा कोणीही या बक्षीस रकमेचे श्रेय घेऊ नये असेही त्यांनी म्हटले असून माझी वसुंधरा योजनेअंतर्गत मिळालेल्या या बक्षीसातून विकास कामे मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे व्यापारी प्रकाश कलंत्री यांनी म्हटले आहे.



