दिल्लीमधील विद्यार्थ्यांवर हल्ला ही लोकशाहीच्या इतिहासातील दुर्दैवी घटना – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध

दिल्लीमधील विद्यार्थ्यांवर हल्ला ही लोकशाहीच्या इतिहासातील दुर्दैवी घटना – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात


विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध
भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये इंग्रजांनी सुद्धा स्वातंत्र्यसैनिकाशी वेळोवेळी संवाद साधला. सोनम वांगचुक यांचे वडील यांनी जेव्हा लडाख मध्ये उपोषण केले. तेव्हा पंतप्रधानपदी असलेल्या इंदिराची गांधी यांनी स्वतः जाऊन त्यांचे उपोषण सोडवले. मात्र सध्याच्या सरकारला जनतेचे काही घेणे देणे नाही. त्यांनी जनतेला गृहीत धरले आहे.
सध्या संपूर्ण देशांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. सर्वच अनागोंदी वाढली आहे. काँग्रेस पक्ष हा लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे. आता जनतेने सुद्धा यामध्ये सहभागी झाले पाहिजे.काँग्रेसने संसदेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला. खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. नीटच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ते देशभर जागृती करत आहेत. प्रचंड प्रयत्न त्यांचे सुरू आहे.देशामधील लोकशाही आणि राज्यघटना जपण्यासाठी सध्या जनतेने पुढे आले पाहिजे. देशात व राज्यात सुरू असलेल्या अनागोंदीची दुरुस्ती दुरु करण्याची जबाबदारी जनतेची आहे.याचबरोबर राज्यामध्ये मतदार पूर्णनिरीक्षण अभियान सुरू आहे. मतदारयादी हा लोकशाहीचा पाया असून सर्वांचे नाव मतदार यादीत आले पाहिजे यामध्ये कोणीही चुकीचे काम करू नये असे ही त्यांनी म्हटले आहे.
सोनम वांगचुक हे मोठे शिक्षण तज्ञ पर्यावरणवादी नेते आहेत. मागील सहा महिन्यापूर्वी माजी शिक्षण मंत्री तथा बेस्ट ऑफ फाईव्ह चे जनक लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी लडाख येथे जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली व सध्याची देशातील राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण व्यवस्थेबाबत त्यांनी चर्चा केली. सोनम वांगचुक रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेते असून त्यांनी हिमालयातील जलसंधारणावर मोठे काम केले आहे. त्यांच्या उपोषणानंतर काल दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र निषेध केला असून संगमनेर तालुक्यातील काँग्रेस सह सर्व पुरोगामी संघटना व सर्व विद्यार्थी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.



