कुकडी प्रकल्पातील पाण्याची तूट भरून काढायची असेल तर अतिरीक्त पाणी निर्माण करावे लागणार – मंत्री विखे पाटील

कुकडी प्रकल्पातील पाण्याची तूट भरून काढायची असेल तर अतिरीक्त पाणी निर्माण करावे लागणार – मंत्री विखे पाटील


कुकडी प्रकल्पातील पाण्याची तूट भरून काढायची असेल तर अतिरीक्त पाणी निर्माण करावे लागणार – मंत्री विखे पाटील
पारनेर । प्रतिनिधी । कुकडी प्रकल्पातील पाण्याची तूट भरून काढायची असेल अतिरीक्त पाणी निर्माण करावे लागणार आहे.महायुती सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करीत असून, राज्यामध्ये दुष्काळ आता भूतकाळ ,होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.कुकडी लाभक्षेत्रातील डाव्या कालव्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जवळा येथे करण्यात आले.आ.काशिनाथ दाते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तालुक्यातील गांजी भोयरे येथे रस्ते विकासाचे लोकार्पण करण्यात आले.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,पारनेर तालूका दुष्काळमुक्त करण्याचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू झाले आहे.यापुर्वी सहा उपसा सिंचन योजनांना मंजूरी दिली असून पाण्याची उपलब्धता होईल त्या पध्दतीने सर्व उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून लाभक्षेत्रातील गावांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाच्या माध्यमातून कालव्यांच्या नूतनीकरणाची मोहीम हाती घेतल्यामुळे कालव्याचे संरक्षणा बरोबरच पाण्याची गळती थांबवून वहन क्षमता वाढविण्याचे प्रयत्न असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,धरणातील पाण्याची साठवण क्षमता वाढवावी लागणार आहे.अतिरिक्त पाणी निर्माण करणे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे.

महायुती सरकारने ३६ लाख रुपयांची कर्जमाफी आणि वीजबील माफीचा निर्णय सुध्दा नवी संधी निर्माण करून देणारा आहे.पारनेर तालुक्यात ३२००शेतकर्याना २४कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.पारनेर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहीला पाहीजे ही भूमिका तालुक्यातील शेतकर्यानी यापुर्वीच घ्यायला पाहीजे होती असे मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.



